🌻🌻🌻 *विठ्ठल विठ्ठल*🌻🌻🌻
*जशी संगती तशी मती, जशी मती तशी गती*
माणसाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सावध असले पाहिजे. एखाद्या ठिकाणी सावध असून पुरेसे नाही. अशा सावधपणाबद्दल लोक बेफिकीर असतात. याचे मुख्य कारण म्हणजे *माणसाला कळत नसलेले सावधपणाचे महत्त्व.* दारु गुटखा जुगार यांसारखी व्यसने ही का जडतात? तर व्यसने संगतीमुळे होतात.
*जशी संगती तशी मती, जशी मती तशी गती* हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे, असे आपण म्हणतो. त्याचे कारण हेच आहे. हा सावधपणा नीट लक्षात घेतला तर वाईट लोकांची संगत सहज मिळते आणि ती सहजच टिकतेही. *चांगल्या लोकांची संगत मिळणे कठीण आणि टिकणे त्याहून कठीण.* दुर्जनांची संगत मिळतेही आणि टिकतेही सहजच. म्हणूनच संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असायला पाहिजे.
*संगती* या शब्दातच "गती" हा शब्द आहे. तुम्ही जशी संगत धरता त्यानुसार तुम्हाला गती मिळते. संगती हा महत्त्वाचा घटक आहे. *संगतीप्रमाणे आपल्यावर कळत-नकळत "संस्कार" होतात. संस्काराप्रमाणे "आवड" निर्माण होते. या आवडीतून आपल्यात "सवयी" निर्माण होतात. सवयीतून "स्वभाव" निर्माण होतो. स्वभावातून "नशीब" घडते.* नशीबाचा संबंध संगतीत आहे. संगत कुणाची धरायची, चांगल्या माणसांची की वाईटाची, हे तूच ठरव.म्हणूनच जीवनविद्या सांगते,
*" तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"*!!!
- *सद्गुरू श्री. वामनराव पै.*
🌺🌺☀ *सुप्रभात* ☀🌺🌺
No comments:
Post a Comment