पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हण्टल्याबरोबर पळुन जातील

*पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हण्टल्याबरोबर पळुन जातील!*

१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा –

- आज दुकानात नौकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”,
- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा आहे मग आज!”
- पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!”
- तो माझ्यावर निष्कारण चिडला, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!”
- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मिळणार!”

बघा, कसलीही, कितीही भयानक समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते, “ओह! हे असं आहे का?, अरे! हे असं पण असतं का? ओके!” आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात. समजा, एखाद्या दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार, एक उपाय आहे, डोळे बंद करुन, त्या दुखणार्‍या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा, आणि वेदनांची तीव्रता कमी होईल,

गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार परेशान करतात, वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!

२) भुतकाळात घुटमळणे बंद करा –
बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते,
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.”
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.”
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!”
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
- “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती मला अशी म्ह्णाली!”
अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!

३)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! –

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,
- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?
- त्यांच्याकडे इनोव्हा आहे, आपल्याकडे खटारा गाडी!
- ते मेट्रो सिटीत राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?
- ती किती सुंदर दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.
- हिला सासुचा ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!
- तीचा नवरा तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीत्यीये!
इत्यादी इत्यादी..

ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे, गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, आंबा रसाळ, चवदार म्हणुन चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का? केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? सफरचंद-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?

कोणतं फळ चवदार आहे, कुणात औषधी गुणधर्म आहेत, कोणी पाणीदार आहेत, कोणी कोरडी. ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!, कोणी शार्प बिजनेस्मन आहे, कोणी प्रचंड मेहनती आहे, कोणी कलाकार आहे, कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, कोणी शिस्तप्रिय, कोणी यशासाठी भुकेला आहे, कोणी प्रेमासाठी आतुर!

आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं!
तुम्हाला माहीत्येय, ह्या जगात साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, *तुम्हीपण!..*

४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –

आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला दोन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या दोनच गोष्टी सापडतील,

अ) अपुर्ण स्वप्ने,
ब) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!

आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो,

आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!

५) सेवा करण्यार्‍याला आत्मिक समाधान मिळते. -

बघा! किती मजेशीर आहे हे,

- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
- झाड तप्त सुर्याचा उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,
- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.
- सुर्य जिथं भरपुर पाणी आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.

आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृत्तीत पुजनीय मानलं गेलयं.

काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे, आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.

ह्याच पाच सुत्रांचा मिळुन बनतो, लॉ ऑफ अट्रेक्शन! मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणारया, 'आपलं मानसशास्त्र'.......
सगळ्या मित्रमैत्रीणींचं आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो, ह्या प्रार्थनेसह,

बायको ती बायकोच टॉर्च कसा पकडतात ते

बायको ती बायकोच
.
.
.
.
.
रात्री दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं
बायकोने टॉर्च पतीच्या हातात दिला आणि
स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली.
खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली
होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयंकर चढला.
मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि  सांगितलं
की आता तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केला आणि झटक्यात
कुलूप उघडले....
तर बायको पतीवरच भडकली आणि म्हणाली

*आता कळलं का ??*
*टॉर्च कसा पकडतात ते??*

😂😂😂

Shubh sakal positive message drushtikon

*दृष्टीकोन*

एक तरुण आई डायनिंग टेबलापाशी बसून चिंतीत झाली होती . कारण नेहमीचेच . मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते .
घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमीत्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते . या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती .

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपली वहीत काहीतरी लिहीत होती. तिने मुलीला विचारले , "काय करतेयस ?"  मुलगी म्हणाली, "आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving ' .आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात "

आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली . बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय
मुलीने लिहीलं होतं

*- मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..*

*-मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घैतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.*

*- मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .*

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते .
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या

*" income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे ."*

*" घरी भरपूर काम कराव लागत म्हणजेच माझ्याकडे एक घर , एक हक्काचे आश्रयस्थान आहे .."*

*" सणासूदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत ."*

*गोष्टीचे तात्पर्य -*
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..

*चला आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.*

ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते

🏆रोखठोक 🏆

नकारात्मक प्रभावावर सकारात्मक उपाय*

असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?

  तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..

    तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…

    जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.

     उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं,
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...

*ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.*

  म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.

        मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

      तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..

1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
13) मी निरोगी आहे,
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.

*याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल*

तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं,
तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.

आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची दणदणीत सुरुवात असेल!..

ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो, अशा शुभेच्छांसह...

दुखऱ्या अवयवांशी बोला खुप छान विचार

दुखऱ्या अवयवांशी बोला..👍
हो बरोबरच ऐकलत तुम्ही !😊.. गंमत वाटली ना?.. तर मग ऐकाच आता.. मला वाटत काही जणांनी हे कधी ऐकलंही असेल.. जस मीही ऐकलं होतं, पाहिलं होतं "ऑपराह विंफ्रे" च्या एक शो मध्ये, तसेच संह्याद्रीच्या एका talk show मध्येही एका तज्ज्ञांकडून याबद्दल ऐकलं होतं यालाही अनेक वर्षे झाली..
         आता मी आज हे काय सांगणारे अस वाटत असेल ना?  हे खरतर अबाल, वृद्धध, स्त्री पुरुष आशा कोणालाही लागू होईल.. कोणालाही आजमावून बघता येईल.. अस काही..
         अनेक गृहिणी असो व नोकरी करणाऱ्या बायका, पुरुष, म्हातारी माणसं कोणीही.. बघा कोणाचाही काही न काही शरीराचा भाग दुखतो, कधी एखाद्याला एखाद्या भागाचं दुखणं जडत!   किंवा झीज झाल्याने किंवा अन्य कारणाने, आजार वा दुखापतीमुळे एखादा अवयव दुखरा होऊन जातो..
           कुणालाही हे सहन करण अवघडच असत.. मग अस कानावर येत बोलणं.. की .." माझ्या पायामुळे माझं जगणं कठीण बनलाय, किंवा मग माझा हात मला हल्ली त्रास देतो नको नको झालंय" अशांसारखे संवाद आपण ऐकतो.. आणि बघा नकळत आपण आपल्याच शरीराच्या भागांचा तिरस्कार करायला लागतो, त्यांना आरोपी ठरवतो , त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलत राहतो... याचा overall परिणाम माहितेय? आपण आपल्याला सतत negetive vibrations देत राहतो.. यामुळे होत काय? याचा सूक्ष्म परिणाम आपल्यावर होतोच!.. औषध कितीही घेतली तरी मुळात शरीरा बाबत आवश्यक ती सकारात्मकता नसेल तर त्या औषधांचाही परिणाम पुरेसा होत नाही.. परिणामी शरीर दुखत राहत..
     यावर एक नामी, उपयुक्त आणि सोपा उपाय.. love your body!.. give grattitudes to the parts of your body!! थोडक्यात मिळालेल्या शरीरामुळे जे कार्य आपण करू शकतो त्याबद्दल आभारी राहायचं, त्या कुठल्या दुखऱ्या भागाला खूप प्रेम द्यायचं..  म्हणजे नेमकं कसं?
       तुम्हाला हवं असेल तर तेलाने हलका मसाज करा, थोडासा दाब द्या किंवा यातलं काहीच नसेल जमत तर हात त्यावर ठेवा आणि चक्क बोला त्याच्याशी.. कसं?.. ok एक उदा. सांगते.. समजा तुमचा उजवा हात दुखतोय तर तुम्ही म्हणायचं.. की 'माझ्या हाता ! तू आहेस म्हणून माझी सगळी काम काशी सुलभ होतायत, मात्र मी तुझी पुरेशी काळजी नाही घेऊ शकले/ शकलो .. पण आता घेईन.. मला अशीच साथ दे, माझ्या सोबत राहा.. etc.. i mean जे तुम्ही एखाद्या माणसाशी बोललं तस्स बोलायचं.. बघा हा काहींना वेडेपणाही वाटेल.. पण हे खूप अर्थपूर्ण आहे आणि लॉजिकल सुद्धा!..अर्थात काही औषध चालू असतील तर चालू देतच.. त्याचा काही संबंध नाही.. पण अस करायला लागा आणि फरक बघा..😊👍... जबरदस्त results मिळू शकतात.. मात्र यात विश्वास, हवा आणि सातत्य!
        आपल्याला न आवडणाऱ्या body parts बद्दलही आपण खूपदा नकारात्मक होतो.. ते सोडून त्यांनाही प्रेम द्यावं आणि त्यांची काळजी घ्यावी.. हे हक्काने सांगू शकतेय करण मी हा अनुभव घेतलाय आणि मला उत्तम result मिळालाय.. आणि म्हणूनच हे share करून.. तुम्हाला थोडीशी मदत करावीशी वाटली.. अनेकदा गोष्टी माहीतच नसतात .. मी बस्स पोचवलं..
       😊तुम्ही जरूर हे try करा.. करण अनुभव मिळाला की तो अनुभवच विश्वास बनतो..

पोपटपंची त्याची किंमत ५००० आहे

एकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो,
तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो
*दुकानदार* : ५०० रुपये
*ग्राहक*: एवढा महाग, का ?
*दुकानदार*: हो , याला वर्ड, एक्सेल , पावर पॉंइंट सर्व येत.
*ग्राहक*: अरे वा !! आणि हा दुसरा ?
*दुकानदार* :याची, किंमत १०००
याला वर्ड, एक्सेल, पाॅवर पॉंइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रॅमिंग सुद्धा करता येत.
*ग्राहक*: वा वा !!! आणि हा जो झोपलेला आहे तो
*दुकानदार* :त्याची किंमत ५००० आहे .
*ग्राहक*:आणि त्याला काय येत ?
*दुकानदार*: त्याला काय येत माहित नाही, मी त्याला काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला साहेब म्हणतात.

😄😃😃😃😃😃

कोणावर सुड घ्यायचा असेल तर वेलेंटाइन डे स्पेशल

कोणावर सुड घ्यायचा असेल तर,
.
.
.
.
.
१३ फेब्रुवारीला रात्री उशीरा त्याच्या दरवाजात गुलाब, Dairymilk आणि त्याच्या नावाने Greeting Card ठेवा.
.
.
*बाकी त्याची बायको बघेल त्याचे काय करायचे ते.*

😜😜😜😜😜

तुम्ही नाही आटवलं, म्हणून त्यानी साठवलं

एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले.

ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला.

          प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या *बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले.*

         तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की  रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं ?

         ब्लड बँकेने खुलासा केला...

*" तुम्ही नाही आटवलं, म्हणून त्यानी साठवलं ... "*
😂😆😂😆😂😆

उसकी जीवनसाथी विश्वसुन्दरी की तरह दिखे और

😂👌😂👌😂👌

*पुरुष चाहता है कि..उसकी जीवनसाथी विश्वसुन्दरी की तरह दिखे और..
गंगूबाई की तरह काम करे.*

* जबकि नारी चाहती है कि.. उसका जीवनसाथी अम्बानी की तरह कमाये और..
मनमोहन सिंह की तरह चुप रहे.*
😍 आज का ज्ञान समाप्त

तात्वीक "भांडण" सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये

👌👌👌 *हृदयांतर*👌 🤝👌

      तात्वीक "भांडण" सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...
      खरं तर "मतभेद" एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..
      एखाद्याशी "वाद" घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
      "अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन जगू नये..
       शेवटी "मृत्यू" हे सुंदर, शाश्वत "वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे "भय" नसावे.
       आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा "आनंद" उपभोग घेण्यासाठी, याचे "स्मरण" ठेवू या.
       आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे.
       "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे.
  *क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.*.......                                       🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏

शादी शुदा मर्द ज्यादातर राशिफल नहीं पढ़ते

शादी शुदा मर्द ज्यादातर राशिफल नहीं पढ़ते।

वो तो रसोई से चाय के लिए अदरक कूटने की आवाज से अंदाजा लगा लेते है कि उनका आज का दिन कैसा रहेगा😃😃

चाँद, तारे तोड़ना सब ड्रामे हैं ड्रामे

पत्नी से सच्ची मुहब्बत वही करता है जो पत्नी को
"मटर छील कर और मेथी तोड़ कर दे"

बाकी ये चाँद, तारे तोड़ना सब ड्रामे हैं ड्रामे....

😂😂😂😂😂

संक्रांत स्पेशल अहो, लाडू कसे झालेत ?

खरं बोलण्याचं पुण्य आणि बायकोचं प्रेम यांचा एकत्र लाभ...

बायको - अहो, लाडू कसे झालेत ?

नवरा - एकदम क ड क  !! 😉😝

बधिर मन झाले

ग्रूप असावा कुटुंबासारखा नकोच नूसते Joining

*छान कविता*      
  
ग्रूप असावा कुटुंबासारखा
      नकोच नूसते  Joining ...! !
तिथे असावा प्रेम  जिव्हाळा
      नकोच नूसते  Shining .. ! !
त्या शब्दाना अर्थ असावा
      नकोच नूसते Posting ... ! !
सूर जुळावे परस्परांचे
      नकोच नूसते Chatting .. ! !
इमेजेसचे मर्म कळावे
      नकोच  नूसते  Loading ... ! !
Whatsapp मधूनी  ज्ञान  मिळावे 
      नकोच  नूसते  Joking .. ! !
स्नेह सदा  वृद्धिंगत  व्हावा
      मस्त  रहावे  Bonding ... ! !

क्या खूब लिखा है किसी ने

*👌🏿क्या खूब लिखा है किसी ने-*

*लाख दलदल हो,*
*पाँव जमाए रखिये;*

*हाथ खाली ही सही,*      
*ऊपर उठाये रखिये;*

*कौन कहता है छलनी में,*    
*पानी रुक नहीं सकता;*
 
*बर्फ बनने तक,*
*हौसला बनाये रखिये।*  
     
🌹🌹 *l🙏🏼🙏🏼*🌹🌹